शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

... नाही तर भारताचा सीरिया होईल : राजेंद्रसिंह राणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 21:17 IST

उंब्रज (जि. सातारा) : ‘सीरियामधील युद्ध हे धर्मयुद्ध नसून जलयुद्ध आहे. तेथे जे घडतंय ते पाण्यामुळे. भारतातही पाणी प्रश्नावर काम झाले नाही तर पुढील सात वर्षांत भारताचा सीरिया होईल,

ठळक मुद्देपाणी प्रश्नावर काम करण्याचे आवाहन; उंब्रजला चर्चासत्राचे आयोजन

उंब्रज (जि. सातारा) : ‘सीरियामधील युद्ध हे धर्मयुद्ध नसून जलयुद्ध आहे. तेथे जे घडतंय ते पाण्यामुळे. भारतातही पाणी प्रश्नावर काम झाले नाही तर पुढील सात वर्षांत भारताचा सीरिया होईल,’ अशी भीती जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी व्यक्त केली.

येथील महिला महाविद्यालयात सोमवारी ‘ह्युमन राईटस फाउंडेशन’च्या वतीने पाणी प्रश्नावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, कºहाडचे प्रांताधिकारी हिम्मत खराडे, माणचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, ‘ह्युमन राईटस्’चे समन्वयक मच्छिंद्र सकटे, प्राचार्य एस. जे. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

राजेंद्रसिंह राणा म्हणाले, ‘सीरिया या शेतीप्रधान देशातून युफ्रेटीस नदी वाहते. या नदीचा उगम टर्की या देशात होता आणि सीरियामधून ही नदी इराकमध्ये समुद्र्राला मिळते. वीस वर्षांपूर्वी टर्की देशातील नेता अल्ट्रातुटने या नदीवर ६ धरणे बांधली आणि सीरिया व इराकला युफ्रेटीस नदीतून मिळणारे पाणी बंद झाले. सीरिया देशाचे पाणी बंद झाल्यामुळे शेती बंद झाली. गावातील लोक शहराकडे गेले. तेथील अर्थव्यवस्था ढासळली. देश सोडून हे लोक इतर देशांत गेले. त्यामुळे सीरियात अराजकता निर्माण झाली. बगदादीने सीरियावर कब्जा घेतला. आपल्या देशातही पाणी या विषयावर अशी परिस्थिती निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. देशातील लाखो तरुण परदेशात जाऊन, कष्ट करून त्या देशाची प्रगती करू लागलेत. अशीच परिस्थिती राहिली तर पुढील सात वर्षांत भारताचा सीरिया होऊ शकतो.’

सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी मुबलक पाणी उपलब्ध आहे, तर काही ठिकाणी खूप कमी पाणी आहे. माण-खटावकरांच्या पाण्याची अडचण दूर होण्यासाठी पावसाचे पाणी अडवा व जमिनीत जिरवण्याची गरज आहे. पावसामुळे माती वाहून जाते. ती अडवण्याचा प्रयत्न करा व जमिनीतील पोषकता टिकवून ठेवा. ऊस शेतीबरोबर मिश्रशेती करा. राजस्थानमध्ये पावसाचे पाणी जमिनीच्या खाली टाकीत साठवून ते अडचणीच्या काळात वापरले जाते. त्याच पद्धतीने भविष्यात माण, खटावसह पाणीटंचाईच्या गावांना पाण्याचा वापर करावा लागेल.

महाराष्ट्रात जलयुक्त शिवार मोहीम चांगल्या पद्धतीने राबवत असून, त्याची देशभर आपण प्रशंसा करीत आहोत. ही योजना पुन्हा एकदा कंत्राटदारांच्या हातात जाण्याचा धोका आहे. तसेच या योजना ठेकेदारांकडून करून घेऊ नका. त्या योजना लोकसहभागातून राबवा. म्हणजे जादा लाभ होईल,’ असेही राणा म्हणाले. प्रा. मच्ंिछद्र सकटे यांनी प्रास्ताविक केले. एस. जे. जाधव यांनी आभार मानले.उंब्रज येथील महिला महाविद्यालयात सोमवारी पाणी प्रश्नावर आधारित चर्चासत्रात जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल आणि प्रा. मच्छिंद्र सकटे उपस्थित होते.